" श्रावणसरीं......"
रिमझिम श्रावणसरींमधे,
मन तुझ्याच आठवणींमधे दंग आहे,
मनात रुजलेल्या कंच हिरवाईला,
फक्त आणि फक्त हिरवाच रंग आहे,
ओलेत्या पानापानाला,
चिंब पाखरांचा संग आहे,
रानफुलांच्या सुगंधी सोबतीला,
धुंद मृदगंध आहे....
मिटलेल्या पापण्यांत,
सुखस्वप्नांची गर्दि आहे,
प्रत्येक गोड आठवणीला,
रेंगाळण्याची वर्दि आहे....
अन इतक्यात.....
सरींच्या शिडकाव्याने अंग सारं शहारलं....
मिटल्या पापण्या उघडताच नाजुक मन थरारलं.....
कारण तेव्हाच कळून चुकलं,वास्तव समोर उभं ठाकलं....
कि हा तर केवळ भास आहे.......
मला मात्र आजहि याच श्रावणसरींसोबत पुन्हा एकदा,
तुझ्या परतून येण्याची आस आहे ...............सुवर्णा
********************************************************
कविता कशी वाटली याविषयी आपला अभिप्राय़ जरुर कळवावा.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment